अवकाळी पावसामुळे भुईमुगासह पिके पिवळी पडली   

शेतकर्‍यांचे नुकसान

मंचर, (प्रतिनिधी) : सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पावसाचा फटका बागायती भागातील शेती तरकारी पिकांना बसला आहे. अतीपावसामुळे भुईमुगासह इतर पिके पावसाच्या पाण्यामुळे पिवळी झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिके पिवळी झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
 
आंबेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये बारमाही बागायती शेती केली जाते. या भागात अनेक शेतकरी वेगवेगळ्या स्वरूपाचे तरकारी पिके घेत असतात. सध्या शेतकर्‍यांनी लावलेले तरकारी पिके अवकाळी पावसामुळे पिवळी पडली असून पिके खराब झाली आहेत. भुईमुगाचे पीक अनेक गावांमध्ये घेतले जाते. परंतु या भुईमुगाला अती पावसाचा फटका बसला असून भुईमुगाचे पिक पिवळे पडले आहे. तर काढणीला आलेल्या भुईमुगाच्या शेंगाही खराब होणार आहेत. येणार्‍या कालखंडाचे भुईमूग काढणीला येतील. त्या भुईमुगाला सुद्धा या पावसामुळे फटका बसला आहे. त्यामुळे एकंदरीतच मान्सूनपूर्व झालेला या वळवाच्या पावसाचा फटका अनेक शेतकर्‍यांना बसला आहे.
 

Related Articles